शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

प्लास्टिकशिवाय जगणं- दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:00 IST

कुणी काही म्हणा. कितीही सांगा, पण आम्ही प्लास्टिकशिवाय जगायच कसं. असा सवाल दररोजच्या जगण्यात प्लास्टिकशिवाय ज्याचं पानही हलत नाही ते निश्चितपणे विचारतील कारण सकाळी उठल्यानंतर दुधाच्या पिशवीपासून

चंद्रकांत कित्तुरेकुणी काही म्हणा. कितीही सांगा, पण आम्ही प्लास्टिकशिवाय जगायच कसं. असा सवाल दररोजच्या जगण्यात प्लास्टिकशिवाय ज्याचं पानही हलत नाही ते निश्चितपणे विचारतील कारण सकाळी उठल्यानंतर दुधाच्या पिशवीपासून सुरू होणारी प्लास्टिकची गरज दिवसभराच्या दिनक्रमात अनेकवेळा भासते. मात्र, हेच प्लास्टिक मानव जातीच्या मुळावर उठले आहे.

हे सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. कुणी सांगितले तरी त्याची अमंलबजावणी करायची मानसिकता दिसत नाही. यामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी हाच त्यावरचा पर्याय आहे.राज्यात प्लास्टिक बंदी लागू असली तरी आजही काही ठिकाणी प्लास्टिकच्या कॅरीबॅग आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर सुरू आहे. प्लास्टिकचा साठा संपविण्यासाठी व्यापाºयांना दिलेली तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर सरकार या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत किती काटेकोर राहते, यावर राज्यातून प्लास्टिक हद्दपार होणार की नाही ते ठरेल.

हे सर्व सांगायचे म्हणजे आज जागतिक पर्यावरणदिन सर्वत्र साजरा होत आहे. आजघडीला प्लास्टिक हाच पर्यावरणाला सर्वांत मोठा धोका आहे. उपलब्ध माहितीनुसार जगभरात दर मिनिटाला दहा लाख प्लास्टिकच्या शीतपेयांच्या अथवा पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या जातात. वर्षाला एकदाच वापरल्या जाणाºया प्लास्टिकच्या पाच हजार अब्ज पिशव्या वापरल्या जातात. हे प्रमाण प्लास्टिकच्या एकूण उत्पादनाच्या निम्मे आहे. एकदाच वापरल्या जाणाºया या प्लास्टिकच्या वस्तू आपण कुठे टाकतो? एकतर जमिनीत नाहीतर पाण्यात. आज नदी, नाले, ओढे पाहिले असता त्यातील कचºयामध्ये प्लास्टिकच्या वस्तूच जास्त दिसतात. एका अहवालानुसार जगात निर्माण होणाºया प्लास्टिकमधील केवळ नऊ टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर करता येतो. १२ टक्के प्लास्टिक जाळून नष्ट केले जाऊ शकते. उर्वरित ७९ टक्के प्लास्टिकचा कचरा जमिनीवर किंवा अन्यत्र टाकला जातो. तो पूर्णपणे नष्ट होत नाही. या कचºयाचे अवशेष शतकानुशतके राहतात.

अनेक प्लास्टिक वस्तूंचे छोेट्या-छोट्या कणांमध्ये रूपांतर होते. जनावरे आणि मासे यांच्या पोटात हे कण जातात. त्यांच्यामार्फत ते माणसांच्या पोटात जातात आणि आजाराला निमंत्रण देतात. जगातील बहुतांशी जलाशयांमध्ये असे प्लास्टिकचे कण आढळले आहेत. याशिवाय न कुजणारे प्लास्टिक डासांच्या उत्पत्तीलाही कारणीभूत ठरते.प्लास्टिकचे हे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर अनेक देशांनी यामुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्लास्टिकवर बंदी घातली आहे. अमेरिका, जपानसह युरोपियन राष्टÑांत प्लास्टिकचा वापर मोठा होत असला तरी हे देश या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यातही आघाडीवर आहेत. जागरुक आहेत. आफ्रिका खंडातील सुमारे २५ देशांनी प्लास्टिकवर बंदी घातली आहे.

यातील निम्म्याहून अधिक देशांनी प्लास्टिक बंदीचा घेतलेला निर्णय गेल्या चार वर्षांतील आहे. चीन, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड आणि व्हिएतनाम या पाच देशांमधून समुद्रात सुमारे ५० टक्के प्लास्टिक कचरा येतो. हे देश वेगाने प्रगती करीत आहेत. तेथील लोकांचे राहणीमान सुधारण्याबरोबरच त्यांच्याकडून प्लास्टिकच्या वस्तूंचा वापरही वाढला आहे. यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा या देशांमधून समुद्रात मिसळत आहे. भारतातही प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आहे. याबाबत जनजागृतीचे काम सरकार आणि पर्यावरणवादी संस्थांमार्फत सुरू आहे. त्याला सर्वांनी साथ द्यायला हवी. सिंगापूरमध्ये चॉकलेटचा साधा कागदही रस्त्यावर टाकला जात नाही. कारण तो टाकणाºयाला जबर दंड आकारला जातो. भीतीने का होईना कायदा पाळला जातो. भारतात, महाराष्टÑातही कायद्यांची अशी काटेकोर अंमलबजावणी होईल तेव्हाच आपण प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने वाटचाल करू शकू.(लेखक ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक आहेत.)kollokmatpratisad@gmail.com